About Us

ABOUT US

Welcome to kolhapurchitpavansangh.com

स्वातंत्र्योत्तर काळात कोल्हापुरात व.म.जेरेशास्त्री,बंडोपंत धर्माधिकारी,डॉ. नागावकर,आराध्ये वैद्य,जोशीराव,राजाज्ञा,उमराणीकर वैद्य यासारखी नामांकित मंडळी विविध क्षेत्रात कार्यरत होती तरी सामाजिक कार्यात हि मंडळी दुर्र्लक्षिली जात होती. यांच्या प्रयत्नातून ब्राह्मण सभा करवीर ची स्थापना झाली.

गांधी वधानंतर येथील चित्पावन ब्राह्मण समाज इतर ब्राह्मण समाजापासून थोडा अलग पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.आपल्या अथक परिश्रमाने आणि काटकसरी रहाणीमुळे हि सारी चित्पावन कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत होती. ताम्हणकर वैद्य,कोल्हटकर ,जोशीराव ,गोखले,रानडे,फडके अशा समाजातील धुरिणांनी त्यावेळी वारंवार बैठक घेऊन भावी पिढीसाठी चित्पावन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपली एक ज्ञाती संस्था स्थापन करण्याची गरज अधोरेखित केली.परिणामी 4 जून 1964 रोज कोल्हापूर आणि परिसरातील सर्व चित्पावन ब्राह्मणांच्या उन्नतीच्या हेतूने कोल्हापूर चित्पावन संघाची स्थापना झाली आणि त्याची रीतसर नोंदणी करण्यात आली.